Slide 1 of 1
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक वापर टाळा
प्राचार्य डॉ. घोरपडे ः अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पर्यावरण जाणीव जागृती
अशोक बालगुडे
पुणे, दि. 27 ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा, कागदी, कापडी पिशवीचा वापर करा असा संदेश महाविद्यालयीन विद्यार्थी दुकानामध्ये आणि विक्रेत्यांना देत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. रस्त्यावर, इतरत्र टाकून दिलेले प्लास्टिक नदीवाटे समुद्रात मिसळते यामुळे सृष्टीचक्रात आपणच हस्तक्षेप करत असतो. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण अभियान
च्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळा उपक्रम सुरू केला आहे. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सुनीता दानाई-तांभाळे, विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य घोरपडे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाला सहाय्यभूत होईल असे प्लास्टिक संकलन अभियान वर्षभर राबविले जात आहे. त्या अंतर्गत संकलित झालेले प्लास्टिक प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेला सागर मित्र या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येते.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील प्लास्टिकचे संकलन केलेले ६० किलो प्लास्टिक सागर मित्र संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. या उपक्रमांला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
Tags:
Like
Comment
Share