Slide 1 of 1
70हजार कोटींबद्दल बोला... PM मोदींची पवारांवरील टीका ठाकरेंनी परतवली
अशोक बालगुडे
रायगड : शिर्डी येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न केला. काल मोदींनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पवारांनी 70 हजार कोटींची कर्जमाफी केली असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज पडत आहे. या कार्यक्रमानिमित्त इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, जे गुन्हेगार आहेत गद्दार आहेत त्यांना टकमक टोकावर जायची वेळ आली आहे. इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवायची वेळ आली आहे. ईडीची वेळ आली की हे पलिकडे गेले असे मिंदे राजकरण कधी झालं नव्हतं. आम्ही हुकूमशाहीला गाडण्यासाठी एकत्र आलो असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
Tags:
Like
Comment
Share