Slide 1 of 1
ही तर चहा-पान... पवार-आंबेडकर बैठकीबाबत केंद्रीय मंत्री आठवलेंचा टोला
अशोक बालगुडे
नागपूर, दि. 24 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यातून विस्तवही जात नाही. तथापि, आंबेडकर यांना चहा आवडत असल्याने ही चहापानाची भेट असावी, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. इंडिया आघाडीत जाण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर उत्सुक आहेत. त्यामुळे ते जाऊ शकतात अर्थात त्यांच्या इच्छेवर हे अवलंबून आहे, असेही आठवले म्हणाले.
महायुतीत असताना पाच राज्यांपैकी एकाही ठिकाणी भाजपने जागा दिली नाही, याकडे लक्ष वेधले असता, मध्य प्रदेशात आमच्या पक्षाचे पाहिजे तसे बळ नाही. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून जागा मिळाली नाही. पक्षाचे बळ नसलेल्या मतदारसंघात उमेदवार लादण्यात अर्थ नाही. मात्र, राजस्थानमध्ये ६ ते ७ जागांवर आमचे उमेदवार राहतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक मंत्री आणि चार महामंडळांचे अध्यक्षपद मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
अग्निवीरबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांकडे लक्ष वेधले असता, अग्निवीर शहिदांसाठी सरकारी योजना आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही पेट्रोलपंपसह अनेक लाभ देण्यात येतात. गांधी यांनी व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले.
Tags:
Like
Comment
Share