Slide 1 of 1
मुंबई-पुण्यासह पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट
गणरायाच्या पूर्वसंध्येला वरुणराच्या दमदार हजेरी बळीराजा सुखावला
अशोक बालगुडे
मुंबई, दि. 18 : गणरायाच्या पूर्वसंध्येला वरुणराजाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामेही गतीने सुरू झाली आहेत. मात्र, अद्यापही काही वरुणराजाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. दरम्यान, आज हवामान खात्याकडून आज पुणे आणि मुंबईसह आणखी ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सोमवारी कोकण आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वरुणराजाने आठवडाभर सुटी घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने राज्यात बरसण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पहाटेपासूनच आज हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहराला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Tags:
Like
Comment
Share