Title of the notification

Notification body

Hello, your location
Select location
Log In
Home
Feed
Jobs
Events
Sports
Finance
Technology
Food
Fashion
Lifestyle & Travel
Business
Education
Crime
Health & Fitness
Real Estate
News
Automobile
Arts
Religion
Astrology
Politics
Agriculture
Entertainment
Matrimony
Ashok Balgude
14 Sep, 10:33 AM
more-icon

Pune News उंड्रीकरांच्या जलवाहिनी दुरुस्तीला मनपा प्रशासनाला सापडेना मुहूर्त

पाच दिवसांनी अर्धा तास पाणी ः 20 टँकरऐवजी दिले जातात अवघे 14 टँकर अशोक बालगुडे पुणे, दि. 14 ः मार्चमध्ये आंदोलनानंतर पालिका अधिकाऱ्यांनी दररोज 20 टँकर आणि हडपसर कामठेमळा-उंड्री दरम्यानच्या जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, आजच्या परिस्थितीत फक्त 14 टँकर पाणी येते, तर जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी पालिका प्रशासन मुहूर्त पाहत असल्याने घसा तहानलेलाच असल्याचा तीव्र संताप उंड्रीकरांनी व्यक्त केला. जि.प.च्या माजी सदस्या स्वाती टकले आणि उंड्री ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष पांडुरंग घुले म्हणाले की, पालिका प्रशासनाकडे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी नव्हे, तर नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आंदोलनानंतर सुरुवातीला नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र, ससाणेनगर-उंड्री दरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडामुळे पाण्याचा दाब कमी कमी होत गेला आणि आता या जलवाहिनीतून पाणी येत नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हडपसर-कामठेमळा-उंड्री दरम्यानची जीर्ण झालेली जलवाहिनी बदलून नवीन टाकली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटण्यास मदत होईल. पावसाने ओढ दिल्यामुळे कूपनलिका आणि विहिरींतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी देण्याचे प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी ओन्ली ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पांडुरंग घुले यांनी केली आहे. उंड्री रहिवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अश्विन खिलारे म्हणाले की, सोसायट्यांमध्ये 95 टक्के नागरिक राहतात. स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाण्याची अपेक्षा राहिली नाही. मागिल 30-35 वर्षांपासून आम्ही पाण्यापासून कोसो दूर आहोत. त्यामुळे पाणी नको विष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. पालिकेला भरमसाठ कर भरतो. मात्र, त्यातून किमान पिण्याचे पाणी तरी द्यावे अशी मागणी वडाचीवाडी येथील अॅस्टोनिया क्लासिक सोसासयटीतील नागरिकांनी केली. प्रथमदर्शनी जलवाहिनीमध्ये काही अडथळा असण्याची शक्यता वाटत आहे. स्वारगेट पाणीपुरवठा विभागाकडून त्याची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग
Tags:  
./../../../../assets/lottie-icons/Like.svg
1
58 Views
like-iconLike
comment-iconComment
share-iconShare
whatsapp-icon
Stay updated with latest
news & trends
Latest News

Sponsored

Create

News/ Post
Job
Event
Marriage AD
Buy and Sell
Push Notifications

Get top news alerts from 5km