Slide 1 of 1
Political News आदित्य ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र ... दीड वर्षांपासून गद्दारांच्या भूलथापा
अशोक बालगुडे
मुंबई, दि. 14 ः बोलून मोकळे व्हायचे आणि निघून जायचे! – घटनाबाह्य मुख्यमंत्री. ही यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेले दीड वर्ष महाराष्ट्र या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेत आहे. या शिंदे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचे नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचे म्हणून ज्यांनी यांना घडवले, वाढवले, पदे दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार? दुर्दैव आहे आमच्या राज्याचे की गद्दारी करून हे असले खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादले गेले आहे.! अशी, टीका शिवसेना (उबाठा) आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट करत केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जात आहे.
शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Tags:
Like
Comment
Share